Wednesday, October 24, 2012

[ साथ तू देशील का ? ]



माझ्या कवितेतील शब्दांना ,
समजून तू घेशील का ?
मनातील सर्व भावनांना ,
एकूण तू घेशील का ?


माझ्या नयनातील सागराचा ,
किनारा तू बनशील का ?
मनातील प्रत्येक स्वप्न ,
तू , अस्तित्वात आणशील का ?


जीवनातील प्रत्येक सुखाचे ,
कारण तू बनशील का ?
दु:खात असेलच जर मी कधी ,
तर डोळे माझे पुसशील का ?


हृदयातील प्रत्येक ठोक्याचा (स्पंदनाचा ),
श्वास तू बनशील का ?
थोडासा विचार करून माझ्यासंगे ,
एक छानसे घरटे सजवशील का ?


स्वप्न म्हणून जगात आहे ,
जीवनात तू येशील का ?
आयुष्यातील अखेरच्या
क्षणापर्यंत ,
साथ तू देशील का ?
साथ तू देशील का ?


            -  राहुल

Thursday, September 29, 2011

|| पावसाळा ||


   ||  पावसाळा ||


थंडगार आला वारा ,
ओल्या पावसाच्या गारा ,
फुले मोराचा पिसारा ,
आला अंगी तो शहारा...||१||


निळे पिसारे ते घण,
दाट आले ते भरून,
जीव झाला तो बेभान,
संगे पावसाचे कण....||२||


हिरवीगार झाली राने,
फुले वृक्ष ,वेली,पाने,
कानी पाखराचे गाणे ,
आले नयनी  पहाणे ....||३||


धुंद वाऱ्यासंगे येई ,
गोड मातीचा सुवास ,
सात रंग आले नभी ,
झाले तृप्त आज मन.....||४||


 - - राहुल (७ सप्टेंबर २०११ )


Monday, August 1, 2011

-"(एक अयशस्वी प्रेम)"-

प्रियकर आपल्या मरण पावलेल्या प्रेयसीच्या फ़ोटोकडॆ पाहुन
मनात आलेला दुख्ररुपी विचार.................................

-"(एक अयशस्वी प्रेम)"-

खुप दिवसानंतर  जेव्हा,ती मला भेट्ली,
आठवणी होत्या त्याच,फ़क्त वेळ होती सरली,

बघता बघता तिची नजर,जेव्हा नजरेला जुळ्ली,
क्षणभर वर पाहुन,माझी मानच खाली वळली,

डोळे आले भरुन,भरुन अश्रु आले अकाली,
कारण गेले होते तिचे प्राण गेल्या पहाटेच सकाळी,

आठवते मला दुखात माझ्या तिच होती धावली,
अस्तित्वच तिचे नाहिशे झाले,पण उरली आठ्वणीची सावली,

दुखच होते मनात, तशी वेळ्च होती आली,
होते संपले सगळे काही,पण किंमत प्रेमाची मात्र कळाली...................

- राहुल( २००८ मार्च २३)

Friday, December 24, 2010

जीवन - एक प्रवास



जीवन - एक प्रवास

जीवन हा एक प्रवास आहे,
हे जाणायला तू उशीर करू नकोस,
सुख : दुःख
तर असतीलच सोबत,
मधेच मात्र तू कधी
थांबू  नकोस.............

आत्मविश्वास आणि आशीर्वाद ,
त्यांना सोबत घ्यायला तू विसरु नकोस,
जमेल तेवढे तू प्रयत्न कर,
पण मागे वळायचा विचार तु मनी आणु नकोस............


चुकुन अपयश आलेच जर कधी,
हिमंत मात्र तू सोडू नकोस,
पडले यश पदरी तर
कधी,माजून मात्र तू जाऊ नकोस ..................
डोळ्यातील स्वप्न पुर्ण करायचे असेल,
तर हात धरून तू बसु नकोस ,
कष्टाविना या जगात फ़ळ नाही,
हे मात्र तू कधी विसरु नकोस............

जीवनात किती क्षण उरलेत,
याचा विचार तू कधी करू नकोस,
प्रत्येक क्षणात किती जीवन आहे,
याचा विसर तू पडू देवू नकोस...............

जीवन हा एक प्रवास आहे,
हे जाणायला तू उशीर करू नकोस................!!



- राहुल (२३ डिसेबर २०१०)


 

आठवण तुझी ..............

आठवण तुझी ..............

आज काहीतरी हरवल्यासारखे वाटले,
तुझी आठवण आल्यानतर,
सभोवताली शणभर शात वाटले,
तुझी चाहुल लागल्यानतर..........................॥१॥



झोपेत जागे रहावेसे वाटले,
स्वपनात तुला पाहिल्यानतर,
श्वासात श्वास गुतुन राहीले,
तुझी वाट पाहिल्यानतर............................. ||२||


मनात थोड़ी गड़बड़ उडाली,
डोळ्यात तुझ्या पाहिल्यानंतर,
ठेस मात्र जोरात लागली ,
शब्दात तुझ्या अड़खळ्यानंतर............||३||


पुन्हा काहीतरी हरवल्यासारखे वाटले,
तू अदृश्य झाल्यानंतर,
मग मात्र मी जाणले ,
होते आपल्यात खुप अंतर .................||४||


ह्रदय भरून आल्यासारखे वाटले,
स्वप्नातून जागे झाल्यानंतर,
जीवन थाबल्यासारखे वाटले,
साथ तुझी नसल्यानंतर................||५||


शणभर मन अवाक् झाले ,
निर्णय तुझा एकल्यानंतर,
उरले फक्त मैत्रीचे नाते,
माझ्या त्या पोरकया प्रेमानंतर.........||६||




- राहुल (२३ डिसेबर २०१०)

Monday, August 2, 2010

---[प्रेयसी]---

---[प्रेयसी ]---

काय सांगू तुझ्याबदद्ल,
माझे मलाच कळत नाही,
बोलायचे असते खुप मला,
पण बोलायला मात्र जमत नाही......!

तुझा चेहरा जणु,
उगवत्या सुर्याची आठवण,
तुझा सहवास जणु,
अनमोल क्षणांची साठवण........!

तुझे बोलणे जणु,
चिमुकल्या पाखराचे गाणे,
तुझे हसणे जणु.
ग्रीष्मात वसंताचे येणे......!

तुझे डोळे जणु,
अथांग भावनाचा सागर,
तुझी नज़र जणु,
त्या सागरातीलच एक लहर......!

तुझे केस जणू ,
माझ्या दुखांची सावली ,
तुझे ओंठ जणू ,
जीवनातील मधाळ क्षणांची साक्ष ....!

तुझे मन जणु,
ओजळ असंख्य स्वप्नाची,
तुझे स्वप्न जणु,
ओढ उज्जवल यशाची.......!

काय
सांगू तुझ्याबदद्ल,
माझे मलाच कळत नाही,
वर्णन करता करता तुझे,
शब्दच माझे पुरत नाही......!

शब्दच माझे पुरत नाही......!


- राहुल (०६ मे २०१२ )

का ह्यालाच प्रेम म्हणतात?




कधी दुर दुर असतेस,
तर कधी अचानकच समोर येतेस,
नजरेला नजर भिड्ते आणि,
अचानकच ओठ शिवले जातात,

त्यानंतर सुरु होतो,
तो म्हणजे नजरेचा सवांद,

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

गर्दीतही एकटेपणा वाट्तो,
गोंधळातही फ़क्त एकच आवाज कानी पड्तो,
सभोवताली फ़क्त एकच चेहरा दिसतो,
तु नसतानाही तु असल्याचा भास होतो,

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

पहिल्यांदा जेव्हा पाहिले तुला,
तो क्षण तर आजही आठवतोय,
त्या क्षणा च्या आठ्वणीने तर,
माझा प्रत्येक
क्षण मजेत जातोय,

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

होय,तर नक्कीच मी प्रेमात पड्लोय,

आता,आता फ़कत एकच ध्यास जीवनात,
मिळवायचा तो फ़क्त तुझाच सहवास,

पण करावा लागेल विचार थोडा यासाठी मला,
सांगावे लागेल सर्व काही मनातले फ़क्त तिला..!!

- राहुल बनसोडे ( १ मार्च २००८ )